BuzzIndiaNow.com
  • Home
  • Latest News
  • World
  • Editorials
  • India
  • Cities
  • Technology
  • Sports
  • Entertainment
  • Education
  • Blog
  • More
    • Astrology

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Rohit Sharma: Virat-Rohit or Rohit-Yashasvi? – Matthew Hayden has a suggestion for India openers at T20 World Cup | Cricket News

May 10, 2024

Bengaluru woman arrested for alleged murder of transgender live-in partner: Report | Bengaluru

May 10, 2024

End of Rahul Dravid era? BCCI to search for new head coach after T20 World Cup | Cricket News

May 10, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
BuzzIndiaNow.com
Saturday, June 13
  • Home
  • Latest News
  • World
  • Editorials
  • India
  • Cities
  • Technology
  • Sports
  • Entertainment
  • Education
  • Blog
  • More
    • Astrology
BuzzIndiaNow.com
Home»Education»National Education Policy 2020,भारतीय ज्ञान आणि ‘एनईपी’ – national education policy-2020 indian knowledge traditions subject
Education

National Education Policy 2020,भारतीय ज्ञान आणि ‘एनईपी’ – national education policy-2020 indian knowledge traditions subject

November 4, 202304 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Reddit Email
National Education Policy 2020,भारतीय ज्ञान आणि ‘एनईपी’ – national education policy-2020 indian knowledge traditions subject
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
– प्रा. डॉ. विवेकानंद रणखांबे

भारतीय ज्ञान आणि ‘एनईपी’


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या संबंधी ‘यूजीसी’च्या वतीने आयोजित प्रशिक्षण मालिका नुकतीच दिल्ली येथे पार पडली. महाराष्ट्रात तीन/चार वर्षांच्या पदवीसाठी प्रथम वर्षाच्या-प्रथम सत्रात‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयाचा दोन क्रेडिट अर्थात ३० तासांच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. आज ज्या कालखंडातून देश पुढे निघाला आहे, त्या वेळी जगाला भारत जाणून घेण्याची एक विशेष उत्सुकता आहे. अशा या देशाच्या भूतकाळाविषयी, या देशाच्या ज्ञान परंपरांचे आपल्याला किती ज्ञान आहे? किती परिचय आहे? ज्या ग्रंथाना आपण अव्हेरतो, नाकारतो, त्यापैकी किती पुस्तकांचा अभ्यास आपण केला आहे? किती गोष्टी आपण मुळातून समजून घेतल्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर खूपच निराशाजनक आहे.

भारताने जगाला शून्याची देणगी दिली, आयुर्वेदासारखी ‘निसर्ग केंद्रित’ आरोग्यप्रणाली दिली, प्राचीन धातुशास्त्राचा चमत्कार म्हणून प्रसिद्ध असलेला दिल्लीचा लोहस्तंभ, स्थापत्यशास्त्राचा अद्भुत चमत्कार म्हणून ज्याच्याकडे पाहावे लागेल असे तंजावर येथील बृहदीश्वराचे मंदिर, अजंठा आणि वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी आणि अपौरुषेय असे चार वेद, अठरा पुराणे, उपनिषदे, षड्‌दर्शने, रामायण, महाभारतादी महाकाव्ये, चौदा विद्या, चौसष्ठ कला, चीन-जपान-श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आशिया खंडातील कितीतरी देशांत पोहोचलेला बौद्ध धर्म, ‘अस्तेय’, ‘ब्रह्मचर्य’ आणि ‘अपरिग्रहा’ची शिकवण देणारा जैन धर्म, जडी-बुटी आणि पारंपरिक ज्ञानाधारे अशक्यप्राय व्याधींवर यशस्वी उपचार करणारे मुस्लिम हकीम-वैद्य, योग साधना, संगीत-नाट्य आणि भारतीय कलापरंपरा, यांच्याशी एकरूप होण्याची एक चांगली संधी या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना लाभते आहे.

जगातील सर्वच देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या ज्ञान परंपरा आहेत. या परंपरांवर हजारो वर्षे पुरातन असलेल्या धर्मसत्तेचा प्रभाव असणे साहजिक आहे. त्यामुळेच अमेरिकन आणि युरोपियन ज्ञान परंपरेत ख्रिश्चन धर्माचा, अरेबिक ज्ञान परंपरेवर इस्लाम आणि त्याचप्रमाणे भारतीय ज्ञान परंपरेत हिंदू-बौद्ध-जैन-शीख या भारतात उगम पावलेल्या विचारधारांचा आणि धर्म संस्थांचा प्रभाव सहजच जाणवणार हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीवर आजही काही संस्कृत श्लोक आढळतात. हंगेरीतील बुडापेस्ट शहराजवळ विशेष करून वसविलेले वेदिक व्हिलेज, इंडोनेशिया, थायलंड, म्यानमार, कंबोडिया अशा आपल्या शेजारी देशांच्या इतिहासावर कित्येक शतके टिकून असणारा ‘रामायण आणि महाभारत’ या महाकाव्य, तत्वज्ञान, परंपरा आणि कथांचा प्रभाव, तिथे आजही दसऱ्यात सादर केली जाणारी रामलीला, नाट्य प्रयोग आपल्याला अचंबित करतात. इतकेच नव्हे; तर कितीतरी दक्षिण-आशियायी देशांच्या भाषांचे संस्कृत हेच उगमस्थान आहे.

भारतीय भाषा, विशेषतः संस्कृतादी भाषांचा शेजारील; तसेच पाश्चिमात्य राष्ट्रातील भाषांवर पडलेला प्रभाव आश्चर्यकारक आहे. अग्नी (Ignite), मिथ्या (Myth), मंत्री (Portuguese mandarin), मातृ (Mother), पितृ (Father), दुहितर (Daughter) अशा कितीतरी शब्दांचे आदान-प्रदान झाल्याचे दाखले मिळतात. आर्यभट्ट हे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ग्रीसमधील आर्किमिडीज; तसेच इजिप्शियन गणितज्ञांप्रमाणेच ‘पाय’ची किंमत त्यांनी ही ३.१४१६ अशीच निश्चित केली होती, शिवाय ‘पाय’ हा एक गैरगुणोत्तरी अंक असल्याचेही त्यांना माहिती होते.

प्रत्येक वेळी शास्त्राचा, अनुपमानाचा मापदंड लावून हे अभ्यासता येणार नाही. ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी या विषयावर लेखन करताना सांगितले आहे, की आपल्या पूर्वजांनी ‘बृहद-विमानशास्त्र’ लिहिले आहे; परंतु ते वापरून आज विमान तयार करता येणार नाही. अशा वेळी त्यांच्या कल्पना शक्तींप्रति किमान कृतज्ञ असणे आणि उपयोगितेसाठी परंपरेकडून साह्य घेणे आवश्यक आहे.

ही ज्ञान परंपरा नष्ट करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. तक्षशीला-नालंदा सारखी विद्यापीठे उद्‌ध्वस्त करण्यात आली, ग्रंथालये पेटवून टाकल्याच्या घटनांची इतिहासात नोंद आहेत. तरीही श्रुती आणि स्मृतींच्या माध्यमातून, ज्यांनी भारतीय ज्ञान परंपरा टिकवून ठेवली, त्या पिढ्यांचे उपकार आपल्याला विसरता येणार नाहीत.

दोन फेब्रुवारी १८३५ रोजी इंग्रज शिक्षण तज्ज्ञ लॉर्ड मेकॉले यांनी ब्रिटिश संसदेपुढे केलेल्या भाषणात सांगितले होते, की भारताच्या भूमीवर आपण तोपर्यंत राज्य करू शकणार नाही, जोपर्यंत आपण भारतीयांच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा मोडून काढणार नाही.

आज भारतातील कितीतरी अग्रगण्य आयआयटीमधून, विद्यापीठांतून भारतीय ज्ञान परंपरेचे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. भारतीय ज्ञान परंपरेतील कितीतरी गोष्टी आपण एकतर सहजपणे स्वीकारतो किंवा अभ्यासाविना नाकारतो. जे जे पुरातन आहे, ते ते चांगलेच आहे, जे जे संस्कृतमध्ये लिहिले आहे, म्हणून ते स्वीकारलेच पाहिजे असा आग्रह निश्चितच असू नये. भूतकाळाचे अवास्तव स्तोम माजवणे हे या नव्या शैक्षणिक धोरणास आणि अभ्यासात मान्य नाही.

‘भारतीय ज्ञान परंपरा’ ही केवळ मानव जातीचाच विचार करीत नाही, तर ती चराचर सृष्टीचा, इतर प्राणीमात्र, सजीव, निर्जीवांचाही विचार करणारी आहे. सगुण साकार आणि निर्गुण निराकार, व्यक्त आणि अव्यक्त ब्रह्माचा विचार करणारी ही ज्ञानपरंपरा आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांचा विचार मांडणारी सर्वांत प्राचीनतम ज्ञान परंपरा आहे. कोणत्याही परकीय संस्कृतीला हीन न लेखता, कोणत्याही संस्कृतीवर, प्रदेशावर आक्रमण न करता, कुणाच्याही श्रद्धेवर घाला न घालता, आस्तिक आणि नास्तिकाचाही (चार्वाक) विचार तितक्याच आदराने करणारी संस्कृती म्हणून, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहावे लागेल.

या ज्ञान परंपरेचे स्रोत स्वातंत्र्यपूर्व कालखंडात सापडतात. हे स्रोत केवळ स्वातंत्र्योत्तर भारतापुरते मर्यादित नसून, ते स्वातंत्र्यपूर्व अखंड-भारताच्या अर्थात आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश अशा देशांतही शोधावे लागतात.

ज्ञान-विज्ञान-आरोग्यशास्त्र, ललितकला, शिल्पकला, व्यवस्थापनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, न्यायशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, खगोलशास्त्र, गणित, तत्वज्ञान, अध्यात्म, अर्थशास्त्र, साहित्य अशा कितीतरी क्षेत्रांत भारताने संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञानाची निर्मिती केली आहे. ज्ञानाच्या स्वामित्वाच्या पलीकडे विचार करीत, विश्वकल्याणासाठी ज्ञानाची निर्मिती केली आहे, हे विसरता येणार नाही; परंतु गेल्या काही शतकांत आपली अवस्था ही ‘हम से हमारी मुलाकात ही हो न सकी’ अशी झाली आहे. यासाठीच जगाला भारत समजायचा असेल तर आधी तो भारतीयांना समजावा लागेल, समजून घ्यावा लागेल. भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना तो समजून घेता येईल, यात शंका नाही.

Credit: Source link

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email

Related Posts

Social work students train in India | News, Sports, Jobs

May 10, 2024

Kota Student Says Will Be Gone For 5 Years

May 9, 2024

SMT Center recognizes Locklear, Miller-Hendrix for leadership in STEM education

May 8, 2024
Add A Comment

Leave A Reply Cancel Reply

Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Top Posts

Rohit Sharma: Virat-Rohit or Rohit-Yashasvi? – Matthew Hayden has a suggestion for India openers at T20 World Cup | Cricket News

May 10, 2024

Bengaluru woman arrested for alleged murder of transgender live-in partner: Report | Bengaluru

May 10, 2024

End of Rahul Dravid era? BCCI to search for new head coach after T20 World Cup | Cricket News

May 10, 2024

Earthquake of magnitude 4.5 strikes Afghanistan

May 10, 2024

HC closes Amritpal’s plea for temporary release after Punjab facilitated him in filing nomination for LS Polls | India News

May 10, 2024
Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • DMCA
© 2026 BuzzIndiaNow.com - All Rights Reserved!

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.